

भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
शिसे, अॅल्युमिनियम, प्लॅस्टिक आणि रबर या विविध कंपन्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाची भंगार मालावर प्रक्रिया करून पुनर्निर्मिती करणाऱ्या ग्रॅव्हिटा इंडिया या कंपनीची सुरुवात १९९२ मध्ये जयपूरमध्ये एका शिशाच्या पुनर्वापर प्रकल्पापासून झाली. आता तिचे भारतासह युरोप, आफ्रिका, जमैका आणि श्रीलंकेत प्रकल्प आहेत. यात शिशाची प्रक्रियाक्षमता सर्वांत जास्त म्हणजे २,३६,००० टन इतकी असून, त्यातून शुद्ध शिसे आणि मिश्रधातू निर्माण केले जातात. एकूण महसुलात याचा वाटा सुमारे ७८ टक्के आहे.