Missing Person lawव्यक्ती बेपत्ता?... सात वर्षे थांबा, कायदेशीर प्रक्रिया घ्या जाणून!

एखादी व्यक्ती बेपत्ता झाली असेल म्हणजेच तिचा काहीही थांगपत्ता लागत नसेल किंवा ती परांगदा झाली असेल, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये मानसिक त्रास तर असतोच; पण विविध कायदेशीर प्रश्नांनाही सामोरे जावे लागते. अशा कायदेशीर तरतुदींची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 legal process of declaring a missing person dead, inheritance rights
legal process of declaring a missing person dead, inheritance rights E sakal
Updated on

ॲड. रोहित एरंडे

rohiternade@hotmail.com

चित्रपटात आपण पाहतो, की एखाद्या कुटुंबातील मुलगा, भाऊ किंवा नातलग एखाद्या नाट्यमय घटनेनंतर गायब होतो आणि अनेक वर्षांनंतर अवतीर्ण होतो. वास्तवात मात्र, फार क्वचितच असे घडते.

वास्तवात एखादी व्यक्ती बेपत्ता होते, तेव्हा तिचा शोध घेऊनही काहीही पत्ता लागत नाही, अशावेळी काही काळानंतर कुटुंबातील लोकांसमोर अनेक प्रश्‍न उभे राहतात.

एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून बेपत्ता असेल किंवा पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सापडून ज्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही, अशा वेळी त्या बेपत्ता व्यक्तींना मृत मानायचे की नाही? असा यक्षप्रश्न उभा राहतो. कारण अशा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह न मिळाल्याने त्यांना लौकिकार्थाने मृत मानणे आप्तस्वकीयांना क्लेशदायक जाते.

परंतु, त्याचबरोबर अशा बेपत्ता व्यक्तींच्या मालमत्ता, बँक खाती, विमा, प्राप्तिकर, वारसा हक्क, वैवाहिक स्थिती आदी अनेक प्रश्न उभे राहतात. अशा वेळी त्या आप्त व्यक्तींना न्यायालयात धाव घेऊन बेपत्ता व्यक्तीला मृत ठरविण्यासाठी दावा लावण्याशिवाय पर्याय उरत नाही.

याला इंग्रजीमध्ये ‘Death in Absentia’ असे म्हणतात. यासंबंधी स्पष्ट तरतुदी असलेला कायदा अद्यापही आपल्याकडे नाही, हे मोठे दुर्दैव आहे. बेपत्ता व्यक्ती ‘मृत’ घोषित करण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल सात वर्षे काहीही माहिती नाही, हे सिद्ध करावे लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com