अर्थसंकल्प २०२५ मधील बदलापूर्वी, प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४-आयबीनुसार, कोणत्याही विविक्षित व्यक्तीने किंवा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीने (कलम १९४-आयमधील दुसऱ्या तरतुदीनुसार वगळलेले सोडून) रहिवाशांना आर्थिक वर्षात दोन लाख ४० हजार रुपयांपेक्षा अधिक घरभाडे दिल्यास उद्गम कर कपात (टीडीएस) करणे बंधनकारक होते.