Digitalization : महिला उद्योजकांच्या मते डिजिटलायझेशन महत्त्वाचे; जागतिक उद्योजकता सर्वेक्षणातून माहिती समोर

भारतातील महिला उद्योजक डिजिटलायझेशनला लक्षणीय महत्त्व देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
Digitalization
DigitalizationSakal

नवी दिल्ली : भारतातील महिला उद्योजक डिजिटलायझेशनला लक्षणीय महत्त्व देत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘गोडॅडी’च्या जागतिक उद्योजकता सर्वेक्षणानुसार, ९७ टक्के महिला उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायामध्ये डिजिटलायझेशनमुळे कार्यपद्धतीत मोठी सुधारणा झाल्याचे सांगितले.

भारतात सर्वेक्षणात सहभागी महिलांपैकी ५१ टक्के या युवा उद्योजिका आहेत. एआय तंत्रज्ञानाचा व्यवसायाला फायदा होईल, असे मत ८८ टक्के उद्योजकांनी व्यक्त केले. भारतातील उद्योजकतेच्या भविष्याला नवा चेहरा देण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, असे त्यांचे मत आहे.

८२ टक्के महिलांनी तीन ते पाच वर्षांत व्यवसायवृद्धीची अपेक्षा केली. ५७ टक्के महिलांनी बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचा मानस व्यक्त केला. ४७ टक्के उद्योजकांनी ग्राहकांसोबतचे संबंध दृढ करण्यावर लक्ष देणार असल्याचे सांगितले, तर ३८ टक्के महिलांनी सायबर सुरक्षा आणि डेटा सुरक्षा उपाययोजना वाढवण्यावर भर देणार असल्याचे म्‍हटले.

लघू उद्योगाचे स्वरूप बदलतेय

‘गोडॅडी’च्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विभागाच्या उपाध्यक्ष सेलिना बायबर म्हणाल्या, ‘‘डिजिटल तंत्रज्ञानामुळे लघू उद्योग क्षेत्राचे स्वरूप बदलत आहे. महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन क्षेत्रातही यश मिळवता यावे, यासाठी त्यांना सहज वापरता येतील अशी साधने उपलब्ध करण्यावर भर आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com