Premium| Wealth Creation: दिवाळीनंतरही लक्ष्मी कशी टिकवाल?

money and happiness : दिवाळीत लक्ष्मी मातेची पूजा करून तिला आवाहन केलं जातं. पण खरोखरच संपत्ती, कमवायची, टिकवायची आणि वाढवायची असेल तर काय करायचं ते वाचा, सकाळ मनीच्या या विशेष लेखातून.
लक्ष्मी आणि सरस्वती यांचा समतोलच खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे.

लक्ष्मी आणि सरस्वती यांचा समतोलच खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे.

E sakal

Updated on

Kiran Gandhi on the Balance Between Wealth and Values

किरांग गांधी

kirang.gandhi@gmail.com

लक्ष्मीचा आशीर्वाद जर सरस्वतीच्या शहाणपणाशिवाय आणि मूल्यांशिवाय मिळाला, तर तो समाधान देण्याऐवजी चिंता वाढवू शकतो. शिस्त नसलेल्या कुटुंबांमध्ये कोट्यवधी रुपयांचा वारसाहक्क मिळाला तरी अनेक कुटुंबे फुटलेली दिसतात. प्रसिद्धी आणि संपत्ती असलेल्यांना कर्ज किंवा वादात अडकलेले पाहायला मिळते. मूल्यांशिवाय संपत्ती म्हणजे वाळवंटात बांधलेल्या हवेलीसारखी असते, ती भव्य वाटते, पण पहिल्या वादळात ती ढासळते.

पैसा शक्तीशाली असतो. तो आराम, ऐश्वर्य आणि संधी देतो. पण पैसा जर संतुलनाशिवाय साठवला, तर तो सापळा बनतो. अधिक पैसा म्हणजे अधिक आनंद असे समजून, अनेक भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबे जास्त पगार, मोठी घरे आणि मोठ्या थाटामाटात लग्न यामागे धावतात. पण अनेक अभ्यास असे सांगतात, की जरी काही लोकांची कमाई जास्त असली तरी ते ईएमआय, क्रेडिट कार्ड, कर्ज आणि निद्रानाशाच्या त्रासाने त्रस्त असतात. कारण लक्ष्मी जर मूल्यांशिवाय असेल, तर ती अखंड इच्छा वाढवते, पण समाधान कधीच देत नाही. कारण जेव्हा लक्ष्मीला मूल्यांची साथ नसते, तेव्हा ती हव्यास निर्माण करते, समाधान नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com