

अक्षय नाईक, Akshay@moneylife.in / अभय दातार, a_datar@yahoo.in
आपल्या पश्चात आपली संपत्ती आपल्या वारसाला विनासायास मिळावी, यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया आपण हयात असताना करणे गरजेचे असते.
मात्र, अनेकदा असे नियोजन केले नसल्याने वारसांना किचकट, वेळखाऊ प्रक्रियेतून गेल्यानंतर संपत्ती प्राप्त होते. अनेकदा वारसांना संपत्तीबाबत माहिती नसते किंवा वेळखाऊ प्रक्रियेमुळे ते याकडे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे बँकखाती, शेअर, म्युच्युअल फंड अशा विविध पर्यायांमध्ये विनादावा पडून असलेली संपत्ती लाखो-कोटींच्या घरात आहे. प्रसिद्ध आणि ज्येष्ठ पत्रकार-संपादक सुचेता दलाल यांच्या ‘मनीलाइफ फाउंडेशन’ने याबाबत काही उपाययोजना सुचविल्या आहेत.