Premium: Start up loss:‘स्टार्ट-अप’चा अश्‍वमेध अडतो कशामुळे?

startup strategy:काही स्टार्ट-अप मोठा गाजावाजा करून सुरू होतात. मात्र, पुढे ते बंद होतात. यामागे नेमकी काय कारणे असतात? याचा वेध घेण्याचा प्रयत्न.
स्टार्टअप अयशस्वी होण्याची कारणं काय?
स्टार्टअप अयशस्वी होण्याची कारणं काय?E sakal
Updated on

ॲड. सायली गानू-दाबके

contact@lexonomix.com

आपला देश हा स्टार्ट-अप हब म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा मेळ घालून उभारला जाणारा उद्योग म्हणजे स्टार्ट-अप अशी ढोबळ व्याख्या करता येईल. बुद्धिमान भारतीय तरुणाई नावीन्यपूर्ण ‘स्टार्ट-अप’ उभारत असून, सरकारनेही ‘स्टार्ट-अप इंडिया’ अभियान राबवून त्याला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात ‘स्टार्ट-अप’ हा शब्द चांगलाच रुजला आहे. अनेक स्टार्ट-अप कंपन्या चांगली कामगिरी करत असून, त्या बड्या कंपन्या बनल्या आहेत. काही स्टार्ट-अप मोठा गाजावाजा करून सुरू होतात. मात्र, पुढे ते बंद होतात. यामागे नेमकी काय कारणे असतात? याचा वेध घेण्याचा प्रयत्न.

पूर्वी नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाला ‘स्टार्ट-अप’ असे म्हटले जात नसे. आजकाल मात्र प्रत्येक नव्या व्यवसायाला ‘स्टार्ट-अप’ असे म्हटले जाते. माझी ‘स्टार्ट-अप’ कंपनी आहे, असे अभिमानाने सांगितले जाते. कोविड महासाथीच्या काळात अनेकांनी स्वतःचे विविध उद्योग-व्यवसाय सुरू केले, त्यातील अनेक यशस्वी झाले. कोविडनंतरच्या काळात स्टार्ट-अपचा जोर इतका होता, की सरकारनेदेखील त्याची दखल घेतली आणि २०२२ पासून १६ जानेवारी हा दिवस भारतात ‘स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. त्यापूर्वी १६ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने ‘स्टार्ट-अप इंडिया’ हा उपक्रमदेखील सुरू केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com