स्मरण समतेच्या लढ्याचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. त्याला आज (ता. २० मार्च) ९८ वर्षे पूर्ण होत आहेत. पुढील वर्षी या सत्याग्रहाच्या शताब्दीची सुरुवात होईल.
Chavdar Tale Satyagraha
Chavdar Tale SatyagrahaSakal
Updated on

अरुण खोरे

मानवी हक्कांची जी लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली, त्यातील महत्त्वाचा आणि पहिलावहिला टप्पा म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा. अमेरिका आणि ब्रिटनमधून उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर बाबासाहेबांनी संस्थात्मक, संघटनात्मक कामाला सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना झाली. त्यानंतर कोकणपट्टीत असलेल्या महाडच्या टापूत ‘कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद’ भरवण्याचे ठरले. त्याची पूर्वतयारी सुरू झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com