
Dr. A. P. J. Abdul Kalam
sakal
डॉ. जी. सथीश रेड्डी
भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा संरक्षण यंत्रणेचे तातडीने स्वदेशीकरण गरजेचे होते. ब्रिटिश काळात या गरजेकडे लक्षच दिले गेले नव्हते. १९५० मध्ये भारतात शस्त्रे आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणावर ब्रिटनमधून येत होता. १९६०पर्यंत साम्यवादाला आळा घालण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकाही शस्त्रे व दारूगोळा पुरवणाऱ्यांच्या यादीत सामील होऊन भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे पुरवू लागली होती.