राज्याला हवे स्वतंत्र ‘आयुष’ मंत्रालय

महाराष्ट्रातील आरोग्य भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालयाची आवश्यकता आहे. पारंपरिक चिकित्सा पद्धती, जीवनशैली सुधारणा व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा या माध्यमातून आरोग्य सुधारता येईल.
AYUSH Ministry

AYUSH Ministry

sakal

Updated on

डॉ. उमेश तागडे

भारताची आरोग्य परंपरा ही हजारो वर्षांची, शास्त्राधिष्ठित आणि जीवनाभिमुख आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता, मानसिक तणाव व श्वसनविकार यांसारखे आजार झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक चिकित्सा पद्धतींचे महत्त्व पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अधोरेखित होत आहे. आयुष मंत्रालयाशिवाय महाराष्ट्राचे आरोग्य भवितव्य सुरक्षित नाही, हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आता आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com