

Crop Insurance
sakal
कर्जमाफीची ‘आवश्यकता’ आणि तिचा ‘फोलपणा’ या दोन्ही गोष्टी दुर्दैवाने कर्जमाफीच्या योजनेला एकाच वेळी लागू होतात. कर्जमाफी देतानाच त्यानंतरच्या काळात कर्जमाफी मागण्याची शेतकऱ्यांवर वेळच येणार नाही, असा भक्कम आधार तयार होण्याची आवश्यकता आहे. तशी व्यवस्था निर्माण न करता शेतकऱ्यांना पंगू ठेवायचे आणि निवडणुका आल्यावर कर्जमाफीचे गाजर दाखवायचे, हा राजकीय खेळ बंद होणे गरजेचे आहे.