‘जनसुरक्षा’... की असहमतीचे वावडे?

लोकशाहीत संवाद हाच एकमेव मार्ग असतो. मोर्चे, आंदोलने, निदर्शने, राजकीय व्यंग्य, कविता हे व्यक्त होण्याचे मार्ग असतात. त्यातून एकप्रकारे संवाद घडणे अपेक्षित असते. मात्र ‘जनसुरक्षा विधेयका’तून संवादाचे मार्ग बंद झाले तर जनभावना व्यक्त होणार तरी कशी?
Maharashtra Security Bill
Maharashtra Security BillSakal
Updated on

राज्य सरकारने गेल्या आठवड्यात सादर केलेले ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग करत या विधेयकाला विरोध जाहीर केला होता. मात्र विधानसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव सदस्य कॉ. विनोद निकोले यांनीच फक्त विरोध केला. अशाप्रकारे विरोधकांनी जणू सरकारला ‘केक वॉक’ दिला. समाजमाध्यमांतून झालेल्या तीव्र विरोधानंतर संयुक्त समिती नेमून तरतुदींत काही सुधारणा करण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com