

marathi bhasha gaurav din
sakal
डॉ. श्रीरंग देशपांडे
भा षा आणि संस्कृती एकमेकांपासून अविभाज्य आहेत. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती ही जीवनधारा असते. त्याने ‘स्व’त्व मिळते. ‘स्व’त्व रुजले नाही तर आयुष्यभर स्वतःची ओळख शोधत फिरावे लागेल. मातृभाषा टिकावी, संवर्धित व्हावी आणि येणाऱ्या पिढ्यांना ‘स्व’त्व मिळावे यासाठी मातृभाषेतून शालेय शिक्षण मिळालेच पाहिजे. परंतु, दिवसेंदिवस मराठी शाळांची अधोगती होत आहे; अनेक मराठी शाळा बंद होत आहेत.