

अश्विनी देव - editor@esakal.com
कुठल्याही लेखक किंवा कवीला आपल्या साहित्य कारकीर्दीत आपल्या समग्र साहित्याचे खंडात्मक पुस्तक यावे असे वाटत असते. फार थोड्या लेखकांच्या नशिबी असे भाग्य येते. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी हे आहेत. मराठवाड्यातील देगलूरसारख्या तशा आडबाजूच्या गावी राहूनही तांबोळी यांच्या लेखणीने मराठी भाषकांना मोहित केले. मराठी माणसाला ते लक्षात राहिले. क्रमिक पुस्तकामध्ये त्यांची ‘सैनिकी रक्त’ नावाची कथा धडा म्हणून आली आणि अनेक पिढ्यांच्या मनःपटलावर ही कथा खरोखर रुजलीही.