Marathi poetry book review : प्रेम, विरह आणि अस्तित्वाचा संवाद; ‘अडीच अक्षरी’ काव्यसंग्रह

Marathi literature : प्रा. विश्वास वसेकर यांच्या ‘अडीच अक्षरी कविता’ या संग्रहातून प्रेम, अपूर्णता आणि अस्तित्वशोधाचा अंतर्मुख काव्यसंवाद उलगडतो.
Marathi poetry book review

Marathi poetry book review

esakal

Updated on

डॉ. राजेंद्र मुंढे

‘अडीच अक्षरी कविता’ या विश्‍वास वसेकर यांच्या काव्यसंग्रहात आधुनिक मराठी कवितेच्या एका अंतर्मुख, संवादशील आणि तरीही अस्थिर संवेदनांचे प्रतिबिंब दिसते. या कवितांचा काळ नव्वदच्या दशकाच्या शेवटचा आहे. या काळात कवीच्या मनातल्या प्रामाणिक भावनांवर विचारसरणीचे पडदे चढले, नातेसंबंध अधिक ताणले गेले आणि व्यक्ती म्हणून हळूहळू तो स्वतःशी संवाद साधू लागला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर साकार झालेली विश्‍वास वसेकर यांची कविता म्हणजे जणू त्यांच्या अंतर्मनातील स्वगत आहे. ते कधी उघडपणे, कधी कुजबुजत, कधी रागावून, तर कधी निर्विकार शांततेने प्रकट होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com