- प्रकाश शेलार, prakashshelar.lok@gmail.com
दौंड तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी गाव म्हणून खोर एकेकाळी ओळखले जायचे. दर उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी तर सोडाच पण पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागायचा. पिढ्यानंपिढ्या दुष्काळ पाचवीला पुजला असल्याने गावातील युवकांना लग्न जमवण्यासाठी अडचणी यायच्या.