
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीतील सर्वाधिक लोकप्रियतेच्या काळात अरविंद केजरीवाल यांनी त्यांना दिल्लीत रोखले होते. या यशाची ते दिल्लीच्या या निवडणुकीत पुनरावृत्ती करतील का हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल. ऐन मोदीपर्व म्हटल्या जाणाऱ्या काळात दिल्लीत भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर राहिला. ही कमतरता दूर करण्याचा चंग बांधलेला भाजप आणि भाजपशी नॅरेटिव्हच्या लढाईत जशास तसे उत्तर देण्याची क्षमता दाखवणारा आम आदमी पक्ष (आप) यांच्यात लढत आहे.