नीरज चोप्रासारख्या खेळाडूंनी भारताच्या ॲथलेटिक्समधील यशाचे दालन उघडले असले, तरी ही केवळ सुरुवात आहे. भारताने स्पर्धा, पायाभूत सुविधा, व सहकार्याच्या ‘इकोसिस्टीम’च्या आधारे जागतिक पातळीवर मोठी उडी घ्यायची तयारी सुरू केली आहे.
बंगळूरमध्ये जुलै महिन्यात नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धा अगदी मोठ्या उत्साहात पार पडली. टोकियो व पॅरिस या दोन ऑलिंपिकमध्ये पदक पटकावलेल्या ‘वंडरबॉय’ नीरज चोप्रा याचे वलय या स्पर्धेच्या अवतीभवती होते.