

Deccan Dynasties History
sakal
भारतातील प्रमुख राजवटींचा आढावा घेतल्यास उत्तरेत कुषाण आणि गुप्त, तर दक्षिणेत सातवाहन आणि वाकाटक या प्रबळ सत्ता राज्य करीत असल्याचे दिसते. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने मध्य आशियातून आलेल्या शक टोळ्यांचा पराभव केला. या अभूतपूर्व विजयाच्या स्मरणार्थ ‘विक्रम संवत’ ही नवीन कालगणना सुरू केली गेली.