

कुंडलिक पाटील
saptrang@esakal.com
जिल्ह्यासह राज्यभरात सहकारी पाणीपुरवठा संस्थांची चळवळ आर्थिक अडचणीत आली आहे. यातच पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट होत आहे; मात्र कारभारवाडी येथील कै. शिवा रामा पाटील पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून १०२ एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. ठिबकमुळे एकरी ५० टक्के पाण्याची बचत होऊन उसाचे उत्पादन सरासरी ६५ टक्केपेक्षा अधिक वाढले. सामूहिक तत्त्वावरील ठिबक सिंचनमुळे पाण्यावरून होणारे तंटे पूर्ण बंद झाले आहेत.