
रामदास पद्मावार - saptrang@esakal.com
मातीतल्या कणाकणांत शौर्य ओतलेलं… प्रत्येक श्वासात देशभक्ती पेरलेली… अरुणावतीच्या किनाऱ्यावर वसलेलं हरसूल गाव म्हणजे एक चालतं-बोलतं रणांगण! इथल्या मातांनी फक्त मुलांना जन्म दिला नाही, तर मातृभूमीसाठी सैनिक घडवले. इतकंच नाही तर या गावातील तरुण राज्याच्या पोलिस दलातही कामगिरी बजावत आहेत. देशाच्या अंतर्गत पातळीवर आणि सीमेवर इथला तरुण सुरक्षेसाठी सज्ज आहे.