खूप दूरदूरवरून इफ्फीसाठी अर्थात गोव्यातल्या चित्रपट महोत्सवासाठी लोकं आली होती. काही लोकं इतकी दूरवरून की पणजीत पोचल्यानंतर त्यांचा एक दिवस झोप काढण्यात खर्ची झाला. चार दिवस झाले असताना दोघं जण बारमध्ये भेटले. म्हणाले, काही सिनेमे चांगले होते आणि काही वाईट्ट होते. नावं घेणं योग्य नाही पण किती तरी सिनेमे अगदी बंडल होते, किती तरी सामान्य होते. त्यांची निवड कोणी आणि कां केली ते समजलं नाही.