- स्मिता देव, smitah37@gmail.com
आपण जेव्हा घरी असतो, जेवण, चहा-नाश्ता, सर्व विनासायास मिळत असतं, तेव्हा त्याचं महत्त्व विशेष जाणवत नाही! ती किंमत पुष्कळदा बाहेर एकटं राहायला लागल्यावर कळते. किती दिवस खाणावळी, रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये खाणार?... शिवाय सगळ्या गोष्टींचे खर्च वाढलेले असतात. स्वयंपाकघरात जबाबदारी घेऊन काही करण्याची अनेक मुलामुलींची ही पहिलीच वेळ असते.