केसरीचा मान, महाराष्ट्राची शान

महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती या खेळाला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. खाशाबा जाधव यांनी १९५२च्या ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकले आणि याच वेळी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा जन्म झाला. २९ जानेवारीपासून अहिल्यानगर येथे ही प्रतिष्ठेची स्पर्धा पार पडणार आहे.
Maharashtra Kesar
Maharashtra KesarSakal
Updated on

जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com

महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणून कुस्तीकडे बघितले जाते. याच मातीतील खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिकमधील कुस्ती या खेळामध्ये ब्राँझपदक पटकावत इतिहास रचला. महाराष्ट्रात याचदरम्यान कुस्ती या खेळाचा प्रसार व प्रचार वेगाने होऊ लागला. ‘महाराष्ट्र केसरी’ या स्पर्धेचा उगमही याच कालावधीत झाला. महाराष्ट्रातीलच नव्हे देशातीलही प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विजयी ठरलेल्या महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी पुढे जाऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान यश मिळवले. आता २९ जानेवारीपासून अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील विजयी वीर व त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवलेला ठसा यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com