

रवींद्र माने- saptrang@esakal.com
एकेकाळी दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या मणेराजुरी गावाने द्राक्ष पिकाची वाट धरली आणि देशातल्या मोठ्या बाजारपेठांमध्ये आपल्या उत्पादनाला स्थान मिळवलं. शेततळी तयार करून पाण्याची खात्री करून उत्पादनावर मेहनत घेत आपल्या द्राक्षांना बाजारपेठ मिळवण्यासाठी थेट मार्केटमध्ये जाऊन आपली उत्पादने विकली. बेदाणे करण्यासाठी द्राक्षे शिल्लकच राहत नाहीत, असे यश या शेतकऱ्यांनी मिळवले आहे.