संसदेतील चर्चेत अर्थातच राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे विधान केले त्यावरून गदारोळ निर्माण झाला. शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, अशी भूमिका घेऊन विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शहा यांच्या भाषणातील अगदी अल्प कालावधीतील वाक्यांवरून सगळा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वादातील जी वाक्ये आहेत, ती अवघ्या १२ सेकंदांमध्ये आहेत. मात्र काँग्रेसने यावरून देशभर वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.