
ऋचा थत्ते
प्रत्येक युगातील, काळातील संपूर्ण राष्ट्राचा, व्यक्तीचाही उद्धार करण्याची असीम ताकद रामकथेत आहे. मराठी मातीचं भाग्य थोर की इथे गीतरामायणाच्या रूपाने रामकथेचं सुरेल शिल्प गदिमा-बाबूजी या दोन शिल्पकारांनी घडवलं. याआधारे रामकथा समजून घेतली तरी रंजनातून अंजन घातलं जाईल.