
रजनीश जोशी
saptrang@esakal.com
सो लापुरात अनेक समाज आहेत. दर गुरूवारी दक्षिण-उत्तर कसब्यात ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले...’ हे गीत गात घरोघरी जाणारा ‘बहुरूपी रायरंध’ समाज, प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलणारा ‘घिसाडी’ समाज, भविष्य सांगणारे ‘कुडमुडे जोशी’, नुसत्या चुरचुरीत बोलण्यानं साप दुरडीबाहेर न काढताही खिळवून ठेवणारे ‘गारूडी’ आता दुर्मीळ झाले आहेत.