

Creativity and Lateral Thinking in Marathi
esakal
अभय नरहर जोशी - abhay.joshi@esakal.com
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे...!
अशा शब्दांत कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ बाकीबाब यांनी माणसाच्या कल्पकतेची-सर्जनशीलतेची महती गायली आहे. या कल्पकतेतून माणसानं नवनिर्मिती केली. नवनवे शोध लावले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हीसुद्धा माणसाच्या कल्पकतेतूनच निर्माण झालेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचं (एआय) वादळ सध्या सर्वच क्षेत्रांत घोंगावत आहे. मात्र, अशा या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात कल्पकता हीच यशाची गुरुकिल्ली असणार आहे. माणूस आणि अन्य प्राण्यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाला विलक्षण बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती लाभली आहे. त्याआधारेच माणसाने सृष्टीची अनेक रहस्य उलगडली आहेत.