

Historical Fort Records
esakal
गणाधीश प्रभुदेसाई
महाराष्ट्रातील गड-किल्ले हे शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक किल्ल्यांची उभारणी व दुरुस्ती के होता, तर सिंहगड किल्ला, प्रतापगड किल्ला आणि शिवनेरी किल्ला हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे किल्ले आहेत. डोंगरकडे, समुद्रकिनारी व सपाट प्रदेशात बांधलेले हे किल्ले संरक्षणात्मक दृष्टीने भक्कम होते. आज हे गड-किल्ले पर्यटनस्थळे असून ते महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. पण असे अनेक गड-किल्ले आहे जिथे जायचे सोडा त्यांची नावेही आपल्याला माहीत नाहीत. सातारा व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतच असे असंख्य गड-किल्ले आहेत आणि ते जाणून घ्यायचे असेल तर ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या’ हे पुस्तक संग्रहात असणे गरजेचे आहे.