
प्रशांत कोठडिया- editor@esakal.com
माणगाव (ता. खटाव, जि. सातारा) परिसराच्या रखरखत्या पंचक्रोशीतील ‘निढळ’ हे देशातील सर्वसामान्य गावाप्रमाणेच एक गाव. दुष्काळ पाचवीला पुजलेला. वस्ती पाच हजारांची. मुख्यत्वे करून ज्वारी व बाजरी ह्या जिरायती पिकांचा थोडाफार आधार. गावात प्राथमिक व माध्यमिक शाळेचे अस्तित्व असले तरी, आचके देत चालणाऱ्या शाळा! हंगामी शेतीवर गुजराण होणं अशक्य... मग नोकरी करण्यासाठी गावातील युवा पिढी पुणे-मुंबईच्या आश्रयाला जाणे स्वाभाविकच होते.