
किशोर बळी kishorbali11@gmail.com
मराठी भाषेचे दालन विविध बोलींनी समृद्ध आहे. त्यामुळेच ती अभिजात भाषा आहे. वऱ्हाडी बोलीबद्दल तुमच्याशी संवाद साधण्याची संधी म्हणूनच मला अतिशय मोलाची वाटते. नवी पिढी आणि विशेषतः शहरांत राहणारी मंडळी ह्या बोलींपासून दूर चालली असल्याचे जाणवत असताना हा अस्सल गावरान मेवा किती लज्जतदार आहे आणि हेच आपलं वैभव आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे.