
एकनाथ पवार-saptrang@esakal.com
वेळ साधली तर क्रांती घडविता येते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. अर्थात हे गणित फार कमी जणांना जमते. हे तंत्र एका अख्ख्या गावाने अवगत करून कायापालट केला, असे सांगितल्यास विश्वास नक्कीच बसणार नाही; पण सिंधुदुर्गातील वेतोरे (ता. वेंगुर्ले) गावाने ही किमया साधली आहे. कोणत्या वेळी काय विकायला हवे, याचे गणित जुळवून त्यांनी आंबा, काजू, भाजीपाला, कणगर या पारंपरिक पिकांच्या मदतीने गावाचे अर्थकारणच बदलून टाकले. यातून तयार झालेला शेतीचा ‘वेतोरे पॅटर्न’ नक्कीच मार्गदर्शक ठरतो आहे.