भारतीय सैन्यदलांना ‘सलामी’चा दिवस!

मला मराठीतील आघाडीचे वर्तमानपत्र असलेले ‘सकाळ’ १९७१च्या युद्धाच्या सुवर्ण विजय वर्षानिमित्त विशेष पुरवणी प्रसिद्ध करीत आहे, हे समजल्यावर खूप आनंद झाला.
भारतीय सैन्यदलांना ‘सलामी’चा दिवस!

मला मराठीतील आघाडीचे वर्तमानपत्र असलेले ‘सकाळ’ १९७१ च्या युद्धाच्या सुवर्ण विजय (Vijay diwas 2021) वर्षानिमित्त विशेष पुरवणी प्रसिद्ध करीत आहे, हे समजल्यावर खूप आनंद झाला. १९७१ चे युद्ध भारताच्या (India) इतिहासातील सुवर्ण अध्याय असून, तो भारतीय सैन्याचे बांगलादेशाला (Bangladesh) मुक्त करताना दाखवलेल्या शौर्य आणि व्यावसायिकतेचे दर्शन घडवतो.

भारतीय सैन्य दलाने १९७१च्या युद्धात मिळवलेल्या विजयामुळे दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल पूर्णपणे बदलून गेला. हे युद्ध आपल्या सैन्य दलांनी दाखवलेल्या आवेश, उत्कटता व शौर्याचे प्रतीक आहे. हा विजय आपल्याला राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्याच आवेश व उत्कटतेने पुढे जाण्याची प्रेरणा देतो.

१९७१ चे हे युद्ध भारतीय नागरिकांनी दाखवलेल्या मानवतेच्या भावनेचे, वैश्‍विक बंधुभावाचे प्रतीक आहे. आपण भारतीय संपूर्ण विश्‍व हे एक कुटुंब आहे (वसुधैव कुटुंबकम), असे मानतो आणि कायमच सत्य आणि न्यायाची पाठराखण करतो. भारतीय सैन्यदलांनी या युद्धात भारतीयांची शांतता, न्याय आणि मानवतेप्रती असलेली बांधिलकी कायम राहील, हे सुनिश्‍चित केले. मी सैन्यदलांनी या युद्धात दाखविलेल्या धैर्य, शौर्य आणि बलिदानाला सलाम करतो.

मी ‘सुवर्ण विजय दिना’निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारतीय इतिहासातील हा ‘सुवर्ण’ दिवस साजरा करीत असल्यानिमित्त ‘सकाळ’ परिवाराचे विशेष अभिनंदन करतो.

- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री, भारत सरकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com