
अश्विनी देव- editor@esakal.com
मराठीत रहस्यकथा, गूढकथा आणि थरारकथा आपली लोकप्रियता टिकवून आहेत, अनेक जण त्या प्रांतांत मुशाफिरी करत आहेत. नवे नवे लेखक वेगवेगळे विषय हाताळत आहेत. मात्र त्यातही बऱ्याच वेळा विदेशी कथांचा अनुवाद करण्याचे प्रमाण बरेच आहे. या पार्श्वभूमीवर इथल्या वातावरणातल्या आणि मोठा आवाका असलेल्या पुस्तकाचे दर्शन झाले, तो कथासंग्रह म्हणजे सरिता आठवले यांचा ‘विळखा’ हा कथासंग्रह. ही लेखिका मोठा पल्ला गाठेल याची खात्री पटावी अशा यातल्या कथा आहेत.