
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
पत्र म्हणजे काय, तर मनाने मनाला घातलेली साद. आपल्या हातात आलेल्या पत्राला आपल्या जिवलगाचा स्पर्श झालाय आणि त्यावर फक्त आपल्यासाठी उमटलेली ही अक्षरंही त्याची आहेत, या गोष्टीनेही त्या काळी भरून येत असे. कलाकार आणि रसिकांमधील नातं दृढ करणारा सुंदर दुवा पत्रच होतं. मनाचा मनाशी संवाद म्हणजे पत्र. हा संवाद जपायला हवा.