
दहिवडी : येथील सय्यद बंधूंच्या बागेला आग लागून तब्बल १३५० झाडे भस्मसात झाली. झाडांसह साहित्य जळाल्याने साधारण दहा लाखांचे नुकसान झाले. शहरापासून हाकेच्या अंतरावर दहिवडी- फलटण रस्त्यालगत मुन्शी सय्यद, शब्बीर सय्यद व इतरांनी विविध झाडांची लागवड केली आहे. या ठिकाणी २८ एप्रिलला दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. जोराचा वारा व कडक उन्हामुळे आगीचा भडका उडाला.