43 Bridges in Satara District Declared Unsafe
sakal
- सचिन शिंदे
कऱ्हाड - पावसाळा आला, की पुलांच्या पुनर्बांधणीपासून त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटसारखे विषय गाजतात. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या अहवालात ४३ पूल धोकादायक झाले असल्याचा निष्कर्ष काढत, त्यांचे डेथ वॉरंटच जारी केले आहे. अहवालानुसार पुढील पाच वर्षांत त्यांची तातडीने पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे, तर त्यासाठी १७० कोटी ८० लाख रुपये निधीची गरज असल्याचेही म्हटले आहे.