

Satara
esakal
मायणी: मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतेत असून, मॉन्सूनचा दूत मानल्या गेलेल्या आफ्रिकन ‘चातक’ (जॅकोबीन कुक्कू) पक्ष्याचे खटाव तालुक्यात आगमन झाले आहे. दुष्काळी तालुक्यात पडळसारख्या ग्रामीण भागात या तीन पक्ष्यांचे दर्शन घडले असून, त्याची नोंद जागतिक पातळीवरच्या ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह आणि निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.