
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : शेणोली येथील रेल्वे स्टेशनजवळील बोगद्यात सांडपाणी साचण्याची समस्या काही केल्या सुटता सुटत नसल्याने प्रचंड गैरसोय होत आहे. वारंवार बोगद्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रयत्न होऊनही ही समस्या निकालात निघत नाही. सतत सांडपाणी साचल्याने तेथे दुर्गंधीही वाढली आहे. प्रवासी कसरत करत प्रवास करत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे.
शेणोली रेल्वे स्टेशनजवळ सोनसळ घाटात जाण्यासाठी बोगदा आहे. पूर्वी तेथे रेल्वे गेट होते. रेल्वे खात्याने गेट बंद करून तेथे भुयारी मार्ग उभा केला. यामुळे वाहतूक सुलभ झाली. काही कालावधीनंतर त्या बोगद्यात तेथील संजयनगर लोकवस्तीतील सांडपाणी येऊ लागले. हे पाणी जाण्यासाठी संबंधित खात्याकडून तोकडी उपाययोजना केल्यामुळे ते साचून राहत आहे. सतत पाणी असल्याने भुयारातील रस्ता खराब झाला. भुयारात खड्डे पडले आहेत. त्यातच पाणी साचत असल्याने डबके बनले आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना केली. मात्र, तीही अयशस्वी ठरली आहे. तेथून सोनसळ घाटातून कडेगाव व विटा भागात जाणारी वाहतूक होते. जवळच्या डोंगर भागातील खडी व बांधकाम मटेरियलची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. वाढती प्रवासी व मालवाहतुकीची रहदारी लक्षात घेऊन बोगद्यातील सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी निकालात काढावी, अशी मागणी होत आहे. समस्या प्रलंबित राहिल्यास तेथे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे, त्यापूर्वीच तो प्रश्न निकाली लागण्याची गरज आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.