
सातारा : सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवली. या निवडणुकीत अपयश आले तरी मला कुठलाही तोटा झाला नाही. मागील काही वर्षांत साडेनऊ हजार मयत सभासदांची वारस नोंदी झाली नसल्याने आमच्या बाजूने मतदानाचा टक्का कमी झाला. त्यामुळे कारखान्याने या नोंदी करा अन् पुन्हा निवडणूक लावा, मग निवडणुकी जिंकली नाही, तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना आज पत्रकार परिषदेत दिले.