सरकारच्या नियमांचा नागरिकांना विसर; सार्वजनिक ठिकाणी होतेय मोठी गर्दी

Corona Rules
Corona Rulesesakal

विसापूर (सातारा) : कोरोनाचा वाढता संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनंतर (Lockdown) गत आठवड्यापासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. पुसेगावची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच या शिथिलतेत नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा विसर पडल्याने सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरण्याची भीती आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. (Citizens Forget The Government Corona Rules Satara Marathi News)

Summary

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या शिथिलतेत सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector Shekhar Singh) दिलेल्या शिथिलतेत सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत आस्थापने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीत बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही ठिकाणी संसर्ग संपला, असा समज करून नियमांना बगल दिली जात आहे. सॅनिटायझर, मास्कला बहुतांश नागरिक फाटा देत आहेत. बहुतांश नागरिकांना कोरोना संसर्गाचे काहीही गांभीर्य नसून अनेक जण विनामास्क तर काहीजण गळ्यात मास्क लावून बिनधास्तपणे वावरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरक्षित अंतर व मास्क वापराच्या सूचना प्रशासन वारंवार देत आहे, तरीसुद्धा मास्क न वापरता मला काहीच संसर्ग होणार नाही, अशा संभ्रमात अनेक जण फिरत आहेत. तरीदेखील बाजारपेठेवर कोणाचाही अंकुश नाही. त्यामुळे प्रशासन करतंय काय, असा प्रश्न काही जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत.

Corona Rules
माजी मुख्यमंत्री, राज्यमंत्र्यांचे समर्थन मिळालेल्या 'पॅनेल'चा 21-0 ने 'धुरळा'

दुसऱ्या लाटेत कोरोनाविषयक नियम पाळत कोरोना संसर्ग आटोक्यात आणायला प्रत्येकाने मदत केली. परंतु, समुद्राच्या लाटांसारखा कोरोनाचा आलेख वर-खाली होत आहे. संसर्ग शिखरावर गेला की लोक जागृत होत आहेत. मात्र, संसर्गाचा आलेख खाली आला की कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना नागरिक तिलांजली देत आहेत. ही धोकादायक बाब आहे. यामुळे संसर्ग वाढीला चालना मिळत आहे. संसर्गामुळे अनेकांचे हाल झाले व आताही होत आहेत. किती उद्योग व्यवसाय व्यक्ती व संस्थांना संसर्गामुळे आर्थिक झळ पोचली. याचे परिणाम आजही आहेत.

Corona Rules
क-हाड पालिकेचा फेर अर्थसंकल्प सादर करा; जिल्हाधिकारी

प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे

सध्या संसर्ग मंदावला आहे, तज्ज्ञ तसेच जाणकारांच्या म्हणण्यानुसार तिसरी लाट जुलै-ऑगस्टमध्ये केव्हाही येऊ शकते. त्यामुळे या काळात आपल्याला नियम पाळावेच लागतील, अन्यथा तिसऱ्या लाटेचा सामना करताना नाकीनऊ येऊ शकतात. परिणामी, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Citizens Forget The Government Corona Rules Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com