पावसामुळं महाबळेश्‍वरात ४५० हेक्टर स्ट्रॅाबेरीचं नुकसान

कृषी विभागाकडून नजर अंदाजे करण्यात आलेल्या पाहणीनुसार तीन तालुक्यांतील ४६० हेक्टर स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाले आहे
स्ट्रॅाबेरीचं नुकसान
स्ट्रॅाबेरीचं नुकसानsakal

काशीळ : डिसेंबर महिन्याच्या सुरवातीस मॉन्सूनोत्तर झालेल्या पावसामुळे महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यांतील स्ट्रॅाबेरी पिकांस फटका बसला आहे. कृषी विभागाकडून (Ministry of Agriculture) नजर अंदाजे करण्यात आलेल्या पाहणीनुसार तीन तालुक्यांतील ४६० हेक्टर स्ट्रॅाबेरीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ४५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने येथील शेतकरी कोलमडल्याचे चित्र आहे.

राज्यासह देशात महाबळेश्वरच्‍या स्ट्रॅाबेरीचा गोडवा प्रसिद्ध आहे. थंड वातावरणामुळे येथील स्ट्रॅाबेरीची देशभर मागणी असते. मात्र, तीन वर्षांपासून स्ट्रॅाबेरी पिकांच्या मागे संकटाचे ग्रहण सुरू आहे. कोरोनाच्या काळात मातृरोपे उशिरा येणे, लॅाकडाउनमुळे विक्रीत अडचणी, पर्यटनस्थळे बंद असल्याने स्ट्रॅाबेरीचे अतोनात नुकसान झाले झाले. या संकटातून बाहेर पडत असतानाच या हंगामात स्ट्रॅाबेरीला चांगले दिवस येतील, या आशेवर शेतकऱ्यांनी भांडवली खर्च करत नव्या उमेदीने लागवड केली होती. पहिल्या टप्प्यात लागवड झालेली स्ट्रॅाबेरी सुरू झाली होती. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात सलग चार दिवस झोडपून काढल्याने पहिला बहर वाया जाण्याबरोबर रोपांना मुळकुज लागली आहे.

स्ट्रॅाबेरीचं नुकसान
आता केसपेपरसाठी मिळणार 'युनिकोड' क्रमांक; नागरिकांचा वाचणार वेळ

शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने फळासह रोपेही खराब झाली आहे. नाताळ तसेच नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणीत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने हंगामातील सर्वाधिक दर या काळात मिळतो. मात्र, पावसामुळे स्ट्रॅाबेरीचा पहिला बहर जवळपास वाया गेल्याने डिसेंबरअखेरीस स्ट्रॅाबेरी विकण्यास मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना या चांगल्या दरापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या ठिकाणी रोपेच खराब झाली आहेत, अशा शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पहिला बहर तर जाणार आहेच. मात्र, पुढील बहर मिळून शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडावे, यासाठी स्ट्रॅाबेरी रोपे वाचवण्यावर कृषी विभागाकडून भर दिला जात आहे. स्ट्रॅाबेरीस बुरशी, मुळकुज प्रादुर्भाव वाढणार असल्याने ट्रॅायकोड्रामा, बॅसीलस सबटिलस ही बुरशीनाशके ५० गावांतील सुमारे ५०० ते ५५० शेतकऱ्यांना वाटप केले आहे. उर्वरित बाधित शेतकऱ्यांना वाटपाचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नुकसानीचा आकडा वाढणार

प्राथमिक नजर पाहणीत महाबळेश्वर तालुक्याचे ४५० हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत अनेक गावे, वाड्या-वस्त्या डोंगरात आहेत. या गावात स्ट्रॅाबेरी पीक घेतले जाते. अतिपावसामुळे प्रशासनास पोचता आलेले नाही. सर्व गावांतील प्रत्यक्ष पंचनामे झाल्यावर त्यामध्ये भर पडण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com