
दहिवडी : येथील बाजार पटांगणातील भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून भस्मसात झाले, तर तब्बल वीस लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबतची माहिती अशी, येथील फलटण चौक ते सिद्धनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बाजार पटांगणावर मोहनलाल गुलाबचंद गांधी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे.