

Satara
esakal
पारगाव, ता. 20: धामणी परिसरातील शेती पंपांना वीज कनेक्शन मिळत नसल्याने यापूर्वी केलेल्या आंदोलन प्रसंगी वीज कनेक्शन देण्याची आश्वासन देण्यात आले प्रत्यक्षात त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून माजी सरपंच सागर जाधव व १० शेतकरी हे सोमवार (दि.२२) धामणी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करणार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.