सातारा : भालवडीत अंत्यसंस्कारावरून वाद

प्रशासनाची मध्यस्थी; चार तासांने अंत्यसंस्कार, स्मशानभूमी नसल्याने प्रकार
bhalwadi
bhalwadisakal

बिजवडी : भालवडी (ता. माण) हे गाव स्मशानभूमीपासून वंचित आहे. त्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे यावरून वाद निर्माण होतात. आज दलित समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे, यावरून स्थानिक प्रशासन व दलित समाजाचा वाद झाला. शेवटी ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करायचे, असा निर्णय दलित समाजाने घेतल्यानंतर पोलिसांसह महसूल प्रशासनाने या गावाकडे धाव घेतली. त्यानंतर चार तासांने त्या मृत व्यक्तीवर ओढ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

bhalwadi
सातारा : फलटणमधून विमानसेवा सुरू करणार

भालवडी येथील दलित समाजातील विजय प्रकाश पाटोळे (वय ४२) या व्यक्तीचा सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. गावात स्मशानभूमी नाही. या दलित कुटुंबाकडे जमीन नाही. खासगी शेतमालक अंत्यसंस्कारासाठी विरोध करतात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न दलित समाजासमोर होता. दलित समाजाने हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली; परंतु स्थानिक प्रशासनाकडून त्यांना सहकार्य मिळाले नाही. जागा उपलब्ध करून देणे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य असताना त्यांनी हात झटकल्याने शेवटी दलित समाजाने ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मात्र वाद उफाळून आला. शेवटी पोलिस व महसूल प्रशासनाला गावात यावे लागले. त्यांनी यावर तात्पुरता मार्ग काढत ओढ्यालगत एका ठिकाणी जागा उपलब्ध करून देत अंत्यसंस्कार करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर दलित समाजाने त्या मृतदेहावर चार तासांनंतर अंत्यसंस्कार केले.माण पंचायत समितीचे माजी सभापती याच गावातील असून, स्मशानभूमीसाठी त्यांनी ही प्रयत्न केले होते; परंतु स्थानिक राजकारणामुळे गावात स्मशानभूमी होऊशकली नाही.

bhalwadi
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू; 3 दिवस करता येणार प्रवास

भालवडी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध असूनही राजकीय हेवेदाव्यांमुळे गाव स्मशानभूमीपासून वंचित आहे. स्थानिक प्रशासनाकडून आमच्यावर अन्याय होत असून, मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा दिली जात नाही. जिल्हा व तालुका प्रशासनाने लक्ष देऊन गावात दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारून आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा.

- दीपक पाटोळे, ग्रामस्थ भालवडी.

गावासाठी स्मशानभूमीसाठी निधी मंजूर आहे; परंतु जागेअभावी व उपलब्ध जागेच्या वादामुळे आजपर्यंत स्मशानभूमी झाली नाही. आम्ही गायरानमधील जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. उपलब्ध जागेच्या मोजणीसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव दिला आहे.

- ज्ञानेश्वर एकळ, ग्रामसेवक भालवडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com