

कऱ्हाड : दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांना सविस्तर माहितीच मिळत नाही. शाळांकडून मिळणाऱ्या माहितीवरून अनेकदा शंकांचे निरसनच होत नाही. त्याचबरोबर काहीवेळेला समाजमाध्यमावर आलेल्या चुकीच्या माहितीवरून अनेकदा गैरसमजही निर्माण होतात.