

Farmer Loss Assessment
esakal
कास (जि. सातारा) : राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने दुष्काळसदृश स्थिती असून, शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर आहे. पाच ऑक्टोबरपासून नुकसानीसंदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणपती उत्सवानिमित्त शिंदे दरे येथे आले असून, त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.