
मल्हारपेठ : आबदारवाडी (ता. पाटण) गावातील विधवा महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्याबाबत असणाऱ्या अनिष्ट चाली- रूढींच्या विरोधात एकमुखाने गावातील सर्व महिलांनी हात उंचावून निर्णय घेतला. विधवा माता भगिनींना समाजामध्ये ताठ मानेने जगता व वावरता आले पाहिजे, यासाठी त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला.