satara
satarasakal

वन्य जीवांसाठीच वनांचे रक्षण गरजेचे ; खासदार श्रीनिवास पाटील

अमाप जंगलतोड झाल्याने वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे.

कराड :  वनांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा विकास करणे काळाची गरज आहे.  त्यामुळे वनांचे रक्षण करून व वन्यजीव वाचवली पाहिजेत. असे मत खासदार.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.केंद्र सरकारच्या 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवााचा' भाग म्हणून राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली वन विभागाकडून 'इंडिया फॉर टायगर्स ऑन व्हील्स’ या वाहन रॅलीचा खासदार पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून कराड येथून प्रारंभ झाला. रॅली कराड येथून पुढे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व त्यानंतर काली टाइगर रिजर्व दांडेली, कर्नाटक येथे जाणार आहे. त्यावेळी आयेजीत कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते. नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक दादासाहेब शेंडगे, सातारा जिल्हा उपवनसंरक्षक महादेव मोहित, शिशुपाल पवार उपस्थित होते.

ते म्हणाले, मागील शतकात वाघांची संख्या कमी झाल्याची टिप्पणी आहे. त्याचा परिणाम निसर्ग चक्रावर झाल्याचे दिसून येत आहे. अमाप जंगलतोड झाल्याने वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व देखील नष्ट होत आहे. तसेच जंगल कमी झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळले असल्याने मानव व वन्यप्राण्यातील संघर्ष वाढत चालला आहे. मानवाने निसर्ग चक्र बिघडवून नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण दिल्याचे बोलले जाते. हवामानातील बदल, वेळोवेळी होणारी अतिवृष्टतून तसे दिसून येत आहे, या सर्वाला मानव कारणीभूत ठरत असून आपणच वनांचे रक्षण करून वन्यजीव वाचवले पाहिजेत.

वनविभागाने शाळा, महाविद्यालयात वाघांचे रक्षण, वनांचे जतन करण्यासाठी वन चित्रकला, फिल्म व निसर्गरम्य सहली तसेच निसर्ग सानिध्यात विविध स्पर्धा घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी लाकूड न वापरता पर्यायी मार्गाकडे वळले पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड कमी होईल. सातारा जिल्ह्यात वन विभागाने वनांच्या रक्षणासोबतच वन पर्यटनाला सुध्दा चालना दिली पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यातील रोजगार व लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कास, महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, जावळी, पाटण, कोयना यासारखी अनेक पर्यटनस्थळे सातारा जिल्ह्यात आहेत. पर्यटन वाढल्यास जिल्ह्यात युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. क्षेत्र संचालक समाधान चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com